हरीविठ्ठल नगर येथे मनसे महिला शाखा व नव्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते उद्घाटन; महिलांची जबाबदारी निश्चित

ग्लोबल न्यूज 24 LIVE | जळगाव | 18 जुलै 2025
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हरीविठ्ठल नगर येथे मनसे महिला शाखा तसेच नव्याने सुरू करण्यात आलेल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार व मनसे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

या उद्घाटन प्रसंगी महिला सेनेच्या शाखाध्यक्षपदी अनिता कापुरे यांची, तर उपशाखाध्यक्षपदी लक्ष्मी भिल यांची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम यांनी केले होते.

उद्घाटन प्रसंगी बोलताना ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांनी महिला शाखेच्या कार्याचे कौतुक केले. “हरीविठ्ठल नगरमधील हे कार्यालय परिसरातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेच्या लढ्यात एक महत्वाचे केंद्रबिंदू ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे व महानगराध्यक्ष किरण तळेले यांनी मनसेच्या भूमिका, कार्यपद्धती व जनतेसाठी असलेल्या ध्येयधोरणांचा आढावा सादर केला.

कार्यक्रमास मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार, लताबाई पाथरकर, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, वाहतूक सेना जिल्हा संघटक रज्जाकभाई सय्यद, ॲड. सागर शिंपी, साजन पाटील, सतीश सैंदाणे, संदीप मांडोळे, दीपक राठोड, पंकज चौधरी, ऐश्वर्या श्रीरामे, अनिल दिघे, अविनाश जोशी, राहुल चव्हाण, जामनेर तालुकाध्यक्ष अशोक पाटील, एरंडोल तालुकाध्यक्ष विशाल सोनार, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील यांचा समावेश होता.

या कार्यक्रमात आशुतोष जाधव, रोहिदास मिस्तरी, खुशाल ठाकूर, निलेश खैरनार यांच्यासह परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन ललित शर्मा व श्रीकृष्ण वेगळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन महानगराध्यक्ष विनोद शिंदे यांनी केले.

विधानसभेतील खळबळजनक चर्चेनंतरही एमआयडीसी परिसरात सुरूच आहेत संशयित अवैध धंदे!

पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांचं कार्यक्षेत्र चर्चेत, परिसरातील कारवाईचा प्रश्न अनुत्तरितच

ग्लोबल न्यूज 24 LIVE | जळगाव | 18 जुलै 2025

जळगाव – ज्या अधिकाऱ्यांविषयी थेट विधानसभेत प्रश्न उपस्थित झाले, त्याच एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आजही नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही ठिकाणी संशयितपणे अवैध व्यवहार, सट्टा-पट्टा व इतर गुप्तपणे सुरू असलेल्या धंद्यांची चर्चा पुन्हा ऐकायला मिळत आहे.

विशेष बाब म्हणजे, हेच ठिकाण – जिथे काही महिनेपूर्वी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड आणि बडतर्फ करण्यात आलेले सहायक पोलिस निरीक्षक दत्ता पोटे यांनी एकत्र काम केलं होतं, आणि ज्यावरून राज्याच्या विधिमंडळात तीव्र चर्चा झाली होती – तिथेच आजही परिस्थितीत फारसा फरक न पडल्याचा आरोप अनेक स्थानिकांकडून केला जातो.

विधानसभेत चर्चा, पण प्रत्यक्षात काय?

17 जुलै रोजी विधानसभेत, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, आमदार किशोर पाटील आणि आमदार अनिल पाटील यांनी एमआयडीसी परिसरातील अवैध धंद्यांवरून पोलिस यंत्रणेवर थेट सवाल उपस्थित केला होता.
त्यामध्ये पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्यावर चौकशीचे आदेश दिले गेले, तर उपनिरीक्षक दत्ता पोटे यांना बडतर्फ करण्यात आले.

परंतु, ग्लोबल न्यूज 24 LIVEच्या प्रत्यक्ष पाहणी आणि स्थानिक रहिवाशांच्या प्रतिक्रिया पाहता असे लक्षात येते की पोलिसी कारवाई आणि बदलांची प्रत्यक्ष परिणामकारकता अद्याप पुरेशी जाणवत नाही.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार एमआयडीसी परिसरात आजही पाहायला मिळणाऱ्या संशयास्पद हालचाली:झोपडपट्ट्या आणि बंद गाळ्यांमध्ये सट्टा-पट्टा, मटका व्यवहार,गुटखा व सुगंधी तंबाखूची उघड विक्री काही ठिकाणी चालू असल्याचे लोक सांगतातअवैध गॅस रिफिलिंग व्यवसाय ज्यावर पूर्वी मोठा अपघातही झाला होता,जुगार व ड्रग्ज संबंधित हालचालींचा संशय???

बबन आव्हाडांबद्दल पुन्हा प्रश्न का उपस्थित होतोय?सतत ‘व्हीआयपी’ पोस्टिंग मिळवणं – एमआयडीसी, एलसीबी, गुन्हे शाखा आदी प्रमुख ठिकाणी नेमणूक,विधानसभा चर्चेपूर्वी व नंतरही पदावर राहणं, आणि त्या कार्यक्षेत्रात काही बदल न होणं.

लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या कार्यपद्धतीवर थेट टीका.

“फक्त नाव बदलून काही होत नाही” – नागरिकांची भावना

“आम्ही वेळोवेळी तक्रारी केल्या, स्थानिक पत्रकारांनीही आवाज उठवला, विधानसभेतही चर्चा झाली. पण प्रत्यक्षात आमच्या परिसरात स्थिती फारशी बदललेली नाही. पोलिस ठाण्यात पोहचलेला आवाज तातडीनं कृतीत दिसायला हवा होता.” – असे काही स्थानिक नागरिकांनी सांगितले.

ग्लोबल न्यूज 24 LIVE चं स्पष्ट आणि जबाबदार मत:एमआयडीसी परिसरातील सर्व तक्रारींची सखोल चौकशी व्हावी. जे अधिकारी यापूर्वी कार्यरत होते आणि ज्या भागात अवैध धंद्यांची वारंवार चर्चा होते, त्या संदर्भात गृहविभागाने स्वखात चौकशी करावी.

हे केवळ पोलिस खात्याचं नाही तर नागरिकांच्या विश्वासाचं आणि कायदा-सुव्यवस्थेच्या ध्येयाचंही प्रश्न आहे.


ही बातमी “ग्लोबल न्यूज 24 LIVE” नेटवर्कतर्फे, पत्रकारितेच्या सामाजिक भान आणि कायदेशीर जबाबदारी जपत प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोणत्याही वैयक्तिक वा संस्थात्मक बदनामीचा उद्देश नाही.

“जलगाव में आसरा फाउंडेशन का नि:शुल्क आरोग्य शिविर और रक्तदान अभियान – सरकारी योजनाओं की जानकारी के साथ स्वास्थ्य सेवाओं का अनोखा संगम”

ग्लोबल न्यूज़ 24 लाइव: जलगाव | विशेष प्रतिनिधि | 13 जुलै 2025
आसरा मल्टी पर्पज फाउंडेशन, मेहरूण-जळगाव द्वारा दिनांक 13 जुलाई, रविवार को इक्बाल हॉल, इक्बाल कॉलनी, मेहरूण में एक विशेष वैद्यकीय आरोग्य शिबिर (स्वास्थ्य शिविर) और रक्तदान अभियान का आयोजन किया गया है। यह कार्यक्रम खास तौर पर मोहर्रम के पावन अवसर पर समाजहित में समर्पित किया गया है।

इस शिविर का उद्देश्य गरीब व सामान्य नागरिकों को सरकारी योजनाओं की जानकारी उपलब्ध कराना, नि:शुल्क उपचार व औषधि सेवा देना, और साथ ही रक्तदान के माध्यम से मानवता की सेवा करना है।
🩺 स्वास्थ्य शिविर:

समय: सुबह 9 बजे से दोपहर 1 बजे तक

महिलाओं व बच्चों के लिए विशेष चेकअप

दंतचिकित्सा सेवा, जनरल हेल्थ चेकअप, फ्री दवाइयां

अनुभवी डॉक्टर और नर्सों की टीम की मौजूदगी

महिलाओं के लिए नि:शुल्क प्रसूति की जानकारी भी दी जाएगी।

🔹 सरकारी योजनाओं की संपूर्ण जानकारी (10 बजे से 11 बजे तक):

आयुष्मान भारत योजना

मुख्यमंत्री जीवन ज्योती योजना

महात्मा फुले जन आरोग्य योजना

योजना के अधिकारी स्वयं उपस्थित रहकर रजिस्ट्रेशन और लाभ प्रक्रिया समझाएंगे।

🩸 रक्तदान अभियान:

समय: सुबह 9 बजे से शाम 5 बजे तक

Red Plus+ Blood Bank के सहयोग से

प्रमाणपत्र और ₹50,000 तक का 1 वर्ष का बीमा मिलेगा

मोहर्रम के इस महीने में इंसानियत के नाम पर रक्तदान करने का फैसला लिया गया

📞 संपर्क करें:

आसरा मल्टी पर्पज फाउंडेशन
मेहरूण, जलगाव – 425001
मो.: 9096878612 / 9271232494

इस पहल का मुख्य उद्देश्य है कि आम नागरिकों को स्वास्थ्य संबंधी सरकारी योजनाओं की पूरी जानकारी दी जाए, ताकि उन्हें सरकारी व निजी अस्पतालों में मिलने वाले फायदों का लाभ मिल सके। बहुत से लोग योजनाओं के अभाव में अपना इलाज समय पर नहीं करवा पाते। यह शिविर जनजागरूकता, नि:शुल्क चिकित्सा सेवा, और समाज सेवा की दिशा में एक मजबूत कदम है।

चोपडा शहरात इतिहास घडला! ग्रामीण भागातील योगिता ताई बनल्या पहिल्या पिंक रिक्षा मालक महिलाजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पिंक रिक्षा चे वितरण; महिलांच्या आत्मसन्मानाचा नवा अध्याय….

ग्लोबल न्यूज़ 24 लाइव, जळगाव :
जिद्द असेल तर वाट सापडते” हे पुन्हा एकदा खरं ठरवलं आहे चोपडा तालुक्यातील योगिता ताई यांनी. पुरुषप्रधान व्यवसाय समजल्या जाणाऱ्या रिक्षाचालकाच्या क्षेत्रात त्यांनी दमदार पाऊल ठेवत चक्क चोपडा शहरातील पहिल्या महिला पिंक रिक्षा चालक-मालक होण्याचा मान पटकावला आहे.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, ज्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात योगिता ताईंना पिंक रिक्षा सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमासाठी मराठी प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब जळगाव यांनी विशेष पुढाकार घेतला.

पाच वर्षांपासून मराठी प्रतिष्ठानतर्फे महिलांना रिक्षा मालकी हक्क देण्याचा आणि त्यासाठी प्रशिक्षण, डाऊन पेमेंटची सुविधा देण्याचा उपक्रम राबवला जात आहे. आतापर्यंत २२ महिला शहरात पिंक रिक्षा चालवत असल्या, तरी ग्रामीण भागातून या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या योगिता ताई या पहिल्याच महिला आहेत.

योगिता ताईंचा संघर्ष, आत्मविश्वास आणि धैर्य हा इतर महिलांसाठी दीपस्तंभ ठरणारा आहे. जिल्हाधिकारी डॉ. प्रसाद यांनीही त्यांचा गौरव करताना म्हटले की, “ही फक्त एक रिक्षा नाही, तर ती महिलांच्या स्वाभिमानाची आणि सक्षमतेची चळवळ आहे. ग्रामीण भागातील महिलांनी पुढे येणे ही समाजासाठी सकारात्मक दिशा दाखवणारी गोष्ट आहे.”

या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष अ‍ॅड. सागर चित्रे, माजी अध्यक्ष जितेंद्र ढाके, पराग अग्रवाल, डॉ. चंद्रशेखर सिकची, रितेश जैन, प्रमोद नारखेडे, जयवर्धन नेवे, उद्योजक सुबोध चौधरी, डॉ. सृष्टी सुमोल चौधरी, अश्विन राणे यांच्यासह मराठी प्रतिष्ठानच्या डॉ. सविता नंदनवार, सौ. निलोफर देशपांडे, सौ. हर्षाली चौधरी, सौ. खुशबू जुबेर देशपांडे आणि संदीप पाटील यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या शेवटी मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले व अशा उपक्रमांद्वारे “महिलांना चालना देण्याचे कार्य हेच आमचे सामाजिक कर्तव्य आहे,” असे स्पष्ट शब्दांत नमूद केले.

महानगरपालिका शाळांमध्ये मुली झाडू मारतायत, आठवीच्या पुढे शिक्षण थांबतं – हा का डिजिटल भारत?

उर्दू माध्यमिक शाळांची मागणी अनुत्तरित, अनेक शाळा मुलभूत सुविधांशिवाय – विद्यार्थ्यांच्या भविष्यावर गदा

🖊 प्रतिनिधी, जळगाव | लोकमत

शाळा झाडायच्या की शिकायच्या?”
हा सवाल आज जळगाव महानगरपालिकेतील शेकडो विद्यार्थ्यांपुढे उभा ठाकलाय.
एकीकडे सरकार डिजिटल इंडिया, शिक्षण हक्क आणि शैक्षणिक क्रांतीच्या घोषणा करत असताना, जळगाव शहरातील महानगरपालिका शाळांमध्ये मूलभूत सुविधा नाहीत, आठवीपर्यंतच शिक्षण मर्यादित आहे आणि काही ठिकाणी विद्यार्थिनींनाच झाडू मारण्यास भाग पाडलं जातंय.

याच पार्श्वभूमीवर ‘एकता संघटना, जळगाव’ यांनी चार नव्या उर्दू माध्यमिक शाळा सुरू करण्याची ठोस मागणी महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याकडे केली. मात्र ही मागणी देखील अद्याप कागदांपुरतीच राहिली आहे.

शाळा आहेत पण शिक्षण नाही!

शहरातील अनेक शाळांमध्ये फक्त आठवीपर्यंतच शिक्षण

स्वच्छता कर्मचारी नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना झाडू मारावी लागते

बेंचेस, पिण्याचे पाणी, टॉयलेटसारख्या सुविधा देखील पुरेशा नाहीत

शिक्षण सोडून मुलं-मुली घरबसल्या राहण्याच्या उंबरठ्यावर

चार ठिकाणी उर्दू माध्यमिक शाळा तात्काळ सुरू करा” – एकता संघटना

ज्या भागांमध्ये उर्दू प्राथमिक शाळा आहेत, त्या भागांमध्येच पुढील शिक्षणासाठी शाळा नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण सोडतात. संघटनेने खालील भागांमध्ये शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे:

  1. पिंपराळा HUDCO – शाळा क्र. १९
  2. गेंदालाल मिल – शाळा क्र. १५
  3. पिंपराळा गाव – शाळा क्र. ९
  4. अक्सा नगर – शाळा क्र. ३६

🧾 शासन निर्णयानुसार आयुक्तांना थेट अधिकार

२००९ व २०२४ च्या शासन निर्णयांनुसार, महापालिका आयुक्तांना शाळा सुरू करण्याचा थेट अधिकार आहे. शिक्षण विभागाची परवानगी आवश्यक नाही. तरीसुद्धा, चारही मागण्या रखडलेल्या आहेत.

सुप्रीम कॉलनीत शाळा सुरू – स्वागत, पण इतरांचं काय?

औद्योगिक वसाहतीतील सुप्रीम कॉलनीत उर्दू माध्यमिक शाळा सुरू झाल्याने त्या भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. याबद्दल आयुक्त ढेरे यांचा फारुक शेख, अंजुम रजवी, मतीन पटेल आणि संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
मात्र इतर उर्दूबहुल भागांतील हजारो मुलांचे भविष्य अद्याप अंधारात आहे.

उपस्थित मान्यवर:

फारुक शेख, हाफिज रहीम पटेल, मौलाना इम्रान, अंजुम रजवी (वरिष्ठ पत्रकार), मतीन पटेल (ग्लोबल न्यूज), अनिस शहा, अनवर सिकलगर, आरिफ देशमुख, नजमुद्दीन शेख, सईद शेख, अब्दुल सत्तार शेख आदींची उपस्थिती होती.

“डिजिटल भारताच्या घोषणा करणाऱ्या शासनाला या मुलांचं वास्तव कधी दिसणार?”

शासन आणि महानगरपालिका यांच्या उदासीनतेमुळे एकीकडे मुली झाडू मारतायत, आणि दुसरीकडे शिक्षणाच्या दारातच अडखळतायत.
हे चित्र पालकांच्या डोळ्यांत अश्रू आणतंय, आणि शिक्षण हक्क कायद्यालाच आव्हान देतंय.

विशेष प्रतिनिधी – ग्लोबल न्यूज २४ LIVE, जळगाव
मो. 9405 444 413

डॉक्टर्स डे निमित्त अल-हुफ़ाज़ फाउंडेशन, जळगाव यांची कौतुकास्पद सामाजिक पुढाकार 🌷

जलगांव | 1 जुलाई 2025 | विशेष रिपोर्ट — Global News 24 Live

आज डॉक्टर्स डे या शुभदिनाच्या निमित्ताने अल-हुफ़ाज़ फाउंडेशन, जळगाव यांच्यातर्फे शहरातील काही नामवंत आणि सेवाभावी डॉक्टरांशी विशेष भेट घेण्यात आली. या प्रसंगी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना गुलदस्ते देऊन त्यांच्या अतुलनीय सेवेसाठी मन:पूर्वक आभार व्यक्त केले आणि त्यांचा सत्कार करत त्यांच्या कार्याची मन:पूर्वक प्रशंसा केली.

या उपक्रमात विशेषतःडॉ.चौधरी, डॉ. मंदार पंडित डॉ. मोइज देशपांडे, डॉ. नदीम नज़र आणि डॉ. इमरान खाटिक यांना भेट देऊन त्यांना मुबारकबाद दिली गेली आणि त्यांच्या सामाजिक व वैद्यकीय सेवेचे कौतुक करण्यात आले.

डॉक्टर हे आपल्या समाजाचे असे अनमोल रत्न आहेत जे दिवस-रात्र कुठलाही भेदभाव न करता माणसाच्या वेदनांवर उपचार करतात. विशेषतः आपल्या शहरातील असे डॉक्टर जे गरीब आणि गरजू घटकांना निःस्वार्थ आरोग्यसेवा देतात, ते खरोखरच आदर्श आणि प्रशंसनीय आहेत.

अल-हुफ़ाज़ फाउंडेशन हे नेहमीच अशा व्यक्तींच्या पाठीशी उभे राहिले आहे ज्यांनी मानवतेची सेवा हेच जीवनाचे ध्येय मानले आहे. सेवा आणि समर्पणाच्या या कार्यासाठी आम्ही सर्व डॉक्टरांचे मन:पूर्वक आभार मानतो.

ल्लाह तआला या सर्व डॉक्टरांना उत्तम आरोग्य, सुरक्षितता आणि दीर्घायुष्य प्रदान करो, आणि त्यांच्या सेवेला आपल्या दरबारात कबूल करो. आमीन.

“इंजीनियर साजिद भाई के जन्मदिन पर शिक्षा और सेवा का संकल्प!”

जलगांव | 1 जुलाई 2025 | विशेष रिपोर्ट — Global News 24 Live

आज 1 जुलाई को उद्योगपति इंजीनियर साजिद भाई शेख के जन्मदिन के मोके पर एक सराहनीय सामाजिक पहल देखने को मिली। साजिद भाई, जिन्हें लोग “साजिद वाजिद” के नाम से भी जानते हैं, उनके फ्रेंड्स सर्कल द्वारा जलगाव शहर की महानगरपालिका की मराठी,उर्दू स्कूलों में पढ़ने वाले होनहार विद्यार्थियों को स्टडी किट्स तकसीम किया गया।

हर बच्चे को 100 पेज की पाँच बुक्स, एक पेन, पेंसिल, रबर, शार्पनर और स्केल सहित एक पूरा किट गिफ्ट दिया गया। यह गिफ्ट शिवाजीनगर मराठी स्कूल नंबर 1, मनपा उर्दू 13 नंबर और 36/56 स्कूल और पिंपराला हुडको की उर्दू स्कूल न 19 में दिया गया।

फ्रेंड्स सर्कल का संकल्प:
आने वाले समय में महानगरपालिका स्कूलों में बेंचेज, बुक्स और डिजिटल सुविधाएं उपलब्ध कराने के लिए सतत प्रयास किया जाएगा।

दिल्ली की तरह इन स्कूलों को डिजिटल क्लासरूम, स्मार्ट बोर्ड और सेमी-इंग्लिश/इंग्लिश मीडियम स्कूलों के स्तर तक ले जाने का संकल्प लिया गया।

सरकारी फंड्स को स्कूलों तक लाने के लिए प्रयास होंगे और जरूरत पड़ने पर फाउंडेशन की तरफसे से भी मदद की जाएगी।

इसी के साथ सिविल हॉस्पिटल में भी मरीजों और उनके साथ आए परिजनों को खाने के पैकेट्स वितरित किए। इसके साथ ही पर्यावरण के प्रति जिम्मेदारी निभाते हुए झाड़ रोपण (पौधारोपण) का भी कार्य किया गया।

शहर की स्कूलों में जाकर जब फ्रेंड्स सर्कल के सदस्य पहुंचे तो उन्होंने देखा कि महानगरपालिका शिक्षक कठिन परिस्थितियों में भी बच्चों को दिल से शिक्षा दे रहे हैं। इन शिक्षकों की मेहनत को सलाम करते हुए इंजीनियर साजिद भाई के साथियोने कहा कि ऐसे लोगों के लिए हर संभव मदद की जाएगी।

पूरे शहर में इंजीनियर साजिद भाई को एक ऐसे दानवीर के रूप में जाना जाता है जो जाति–धर्म से ऊपर उठ कर लोगों की मदद करते हैं — चाहे वह शिक्षा का सवाल हो, मेडिकल का खर्च हो या कोई छोटे व्यवसाय की शुरुआत।

इस अवसर पर फ्रेंड्स सर्कल ने बताया कि यह तो शुरुआत है, और आने वाले वक्त में यह मुहिम बड़े स्तर पर महानगरपालिका की स्कूलों में चलाई जाएगी ताकि कोई बच्चा शिक्षा से वंचित न रहे।

ऑनलाइन जुगाराच्या जाळ्यात अडकलेली तरुण पिढी – एक उध्वस्त होत असलेलं आयुष्य!

ग्लोबल न्यूज 24 LIVE विशेष रिपोर्ट | रविवारीची विचारधारा
🗓 दिनांक: 29 जून 2025
✍ लेखक: ॲड. जमील देशपांडे, अध्यक्ष – मराठी प्रतिष्ठान, जळगाव

आजच्या डिजिटल युगात तरुणाई उज्वल भविष्याची स्वप्नं उराशी बाळगून शहरांकडे स्थलांतर करत आहे. शिक्षण, नोकरी, स्वतःचं घर, स्थिरता आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी ते अथक मेहनत करत आहेत. परंतु, या संघर्षमय यशाच्या प्रवासात एक भयानक सावली त्यांना गाठतेय – ती म्हणजे ऑनलाइन जुगार.

केवळ काही मिनिटांत लाखो रुपये कमावण्याचं आमिष दाखवणाऱ्या या सापळ्याने अनेक तरुणांना आपल्या विळख्यात घेतलं आहे. ही समस्या आता वैयक्तिक न राहता सामाजिक संकट बनली आहे.

व्यसनाचे वाढते प्रमाण आणि त्याचे गंभीर परिणाम

ऑनलाइन जुगार हे आता घराघरात पोहोचले आहे. आकर्षक जाहिराती, सेलिब्रिटींचा प्रचार, सोशल मीडियावरच्या चमकदार यशोगाथा – या सगळ्यांचा तरुणांवर खोल परिणाम होत आहे. सुरुवातीला मिळणाऱ्या लहानमोठ्या रकमा मनाला भुरळ घालतात, पण नंतर येतो तो अपरंपार नुकसान आणि आत्मघातकी दबाव.

भारतात दर २-३ दिवसांनी अशा बातम्या येतात की, जुगारामुळे नुकसान झालेल्या तरुणाने आत्महत्या केली किंवा गुन्हेगारी मार्ग अवलंबला.

मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक आघात

या सवयीमुळे डोपामिनचा असंतुलन होतो, ज्यामुळे व्यक्ती पुन्हा-पुन्हा जुगार खेळण्यास प्रवृत्त होते. सततच्या अपयशामुळे निर्णयक्षमतेवर शंका येते, नैराश्य, चिंता आणि तणाव वाढतो. कर्जबाजारीपणा, कुटुंबातील वाद, आणि समाजापासून तुटलेपण हे त्याचे दाहक परिणाम आहेत.

पालक, जोडीदार आणि मुलांवर याचा थेट भावनिक व आर्थिक परिणाम होतो. नात्यांमध्ये विश्वास तुटतो, आणि संपूर्ण कुटुंब एका अपयशी चक्रात अडकतं.

सेलिब्रिटींचा प्रचार आणि सोशल मीडिया प्रभाव

अनेक तरुण सेलिब्रिटींच्या जाहिरातींमुळे जुगाराकडे वळतात. “फक्त एका क्लिकमध्ये करोडपती व्हा!” अशा जाहिरातींच्या आहारी जाऊन ते आपले भविष्य गमावतात. त्यात भर म्हणून, मित्रमंडळी किंवा सोशल मीडियावरचा दबाव तरुणांना जास्त प्रभावित करतो.

🔓 बचावाचे उपाय आणि प्रेरणादायी उदाहरणे

जुगाराच्या सापळ्यातून बाहेर पडणे कठीण असले, तरी अशक्य नाही. प्रथम पाऊल म्हणजे जाणीव!सेलिब्रिटी जाहिरातींना बळी पडू नका,स्थानिक समुपदेशन केंद्र, मानसिक आरोग्य सल्लागार यांच्याशी संपर्क साधासकारात्मक मित्रपरिवारात राहा,मानसिक शांततेसाठी ध्यान, योग आणि नियमित व्यायामाचा अवलंब करा,शंकास्पद प्लॅटफॉर्मची तक्रार सायबर सेल किंवा पोलिसांत जरूर करा,एक तरुण इंजिनीअर जो जुगारामुळे पूर्णपणे कर्जात बुडाला होता, त्याने व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेऊन नवीन कौशल्य शिकले आणि आज तो एक यशस्वी स्टार्टअपचा मालक आहे.

“संकटातून बाहेर पडण्याची ताकद तुमच्यातच आहे,” असे त्याने सांगितले.

🏛 सरकार आणि समाजाची जबाबदारी

जुगार अ‍ॅप्सवर तातडीने बंदी घालणं आवश्यक

शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणीवजन्य कार्यशाळा घेणे

सेलिब्रिटींच्या अशा जाहिरातींवर कायदेशीर बंदी

सायबर पोलीस यंत्रणेची अधिक सक्षम अंमलबजावणी

ऑनलाइन जुगार हा तरुण पिढीसमोरील एक गंभीर धोका आहे. पण प्रत्येक अंधारातून प्रकाशाचा मार्ग निघतोच.
स्वप्न साकार करण्यासाठी शॉर्टकट नव्हे, तर मेहनत, प्रामाणिकपणा आणि संयम यांचा मार्ग स्वीकारा.

👉 तुमचं कुटुंब, समाज आणि देश तुमच्या यशाच्या वाटचालीत सोबत आहे!
👉 जागृत व्हा, सकारात्मक रहा आणि यशस्वी व्हा!
👉 जुगाराला “नाही” आणि आयुष्याला “हो” म्हणा!

लेखक – ॲड. जमील देशपांडे, अध्यक्ष – मराठी प्रतिष्ठान, जळगाव

धर्मगुरुओं का अपमान नहीं सहेंगे – मंत्री पडळकर के बयान पर सर्वधर्मीय एकजुट, गिरफ्तारी और इस्तीफे की मांग

जलगांव | 27 जून 2025
राज्य के मंत्री गोपीचंद पडळकर द्वारा ख्रिस्ती धर्मगुरुओं और धर्मव्यवस्था को लेकर दिए गए आपत्तिजनक और भड़काऊ बयान ने महाराष्ट्र की सामाजिक एकता पर सीधा आघात किया है। उनके बयान के खिलाफ आज जलगांव में सर्वधर्मीय नेताओं ने मोर्चा खोलते हुए कड़ा विरोध दर्ज कराया।

धर्म का अपमान करने वाले मंत्री को पद पर रहने का हक नहीं’ – विरोधियों की दो टूक

पडळकर के बयान को समाज को बांटने की साजिश बताते हुए ख्रिस्ती समाज के प्रतिनिधियों ने स्पष्ट कहा कि “कोई भी मंत्री अगर धर्मगुरुओं के खिलाफ जहर उगलेगा, तो उसे जनता बख्शेगी नहीं।”
आज जिलाधिकारी कार्यालय के बाहर हुए शांतिपूर्ण आंदोलन के माध्यम से ज्ञापन सौंपा गया, जिसमें मंत्री की तत्काल गिरफ्तारी और मंत्रिमंडल से निष्कासन की मांग की गई।

मुस्लिम समाज भी साथ आया मैदान में

इस विरोध में सिर्फ ख्रिस्ती समाज ही नहीं, बल्कि मुस्लिम समाज के प्रमुख सामाजिक संगठनों ने भी भाग लिया।
इकरा एजुकेशन सोसायटी के अध्यक्ष अब्दुल करीम सालार और कादरिया फेडरेशन के अध्यक्ष फारुक कादरी ने एक सुर में कहा – “धर्मगुरु किसी भी धर्म के हों, वे समाज की आत्मा होते हैं। उनका अपमान पूरे समाज का अपमान है।”

ज्ञापन सौंपने वालों में प्रमुख नाम:

पास्टर स्वप्नील नाशिककर, थॉमस पवार, शमुवेल खरात, डायना गायकवाड, अनिल साळवे, पास्टर वळवी, पास्टर प्रसाद वानखडे, पास्टर फ्रांसिस सर और जलगांव जिला पास्टर असोसिएशन के अन्य सदस्य प्रमुख रूप से उपस्थित थे।

संदेश साफ है – नफरत की राजनीति को अब समाज में जगह नहीं

इस विरोध के माध्यम से यह स्पष्ट संदेश दिया गया कि भारत का संविधान हर धर्म को बराबरी का अधिकार देता है, और कोई भी जनप्रतिनिधि अगर नफरत फैलाने की कोशिश करेगा तो जनता उसका लोकतांत्रिक तरीके से विरोध करेगी।

जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अधिकारांची ताकद वापरून ठोस कारवाई केली – एकता संघटनेच्या कार्यकर्त्यांचा संघर्ष रंगला, शाळेच्या मनमानीला आळा बसून ८० विद्यार्थ्यांना मिळाला न्याय!

नशिराबाद : नशिराबाद येथील KST उर्दू हायस्कूल मध्ये ८० विद्यार्थ्यांना त्यांचे टीसी (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) दिले जात नव्हते. मात्र, एकता संघटना आणि नशिराबादच्या जागरूक नागरिकांच्या तीव्र संघर्षामुळे अखेर विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क मिळाला.

तीन दिवस चाललेली संविधानिक लढाई – CEO मीनल करणवाल यांना दिले निवेदन

संघटनेने शिक्षण विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल मॅडम यांना निवेदन दिले, ज्यात शाळा प्रशासनाची मनमानी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होत असलेली खेळवाड याबाबत माहिती देण्यात आली होती.

निवेदन झाले शस्त्र – FIR झाला कारवाईचा पाया

CEO मॅडम यांनी तात्काळ दखल घेत, माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना कारवाईसाठी निर्देश दिले आणि आवश्यकता भासल्यास FIR नोंदवण्याचे आदेश दिले. २७ जून रोजी FIR दाखल झाली आणि प्रशासन हालचालीस लागले.

प्रशासन व पोलिसांनी घेतले चार्ज – शाळेचे कुलूप तोडले

आज २८ जून रोजी, शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षण मंडळ अधिकारी पोलिस बंदोबस्तासह शाळेत पोहोचले.
शाळा प्रशासनाचा अरेरावीपणा आणि शिक्षकांचा हुकूमशाही वर्तन पाहून प्रशासनाने कठोर पाऊल उचलले.

प्रशासनाच्या आदेशावर शाळेचे मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडण्यात आले, कागदपत्रे बाहेर काढण्यात आली, आणि सर्व ८० विद्यार्थ्यांना त्यांचे टीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

फारूक शेख, नदीम मलिक, मतीन पटेल, अनिस शाह, मौलाना रहीम पटेल, मजहर पठाण, वासिफ सर, हाफिज शाहिद, रईस शेख आणि इतर कार्यकर्त्यांनी संघर्षाची सुरुवात पहिल्याच दिवशी केली होती.
आज जेव्हा विद्यार्थ्यांच्या हातात त्यांच्या प्रमाणपत्रांची फाईल होती, त्यांच्या डोळ्यात आनंद आणि मनात समाधान स्पष्ट दिसून येत होते.

आता हे विद्यार्थी ११वीत प्रवेश घेण्यास पात्र झाले असून त्यांचे शिक्षण वाचले आहे.

पालक म्हणाले – “संघटना नसती, तर आम्ही हताश झालो होतो”

पालकांनी स्पष्ट सांगितले की एकता संघटना नसती, तर आम्हाला अजूनही शाळा प्रशासनाकडून दटावले गेले असते.
“आम्ही किती वेळा विनंती केली, पण ऐकलेच नाही… संघटनेमुळे आमचा आवाज पोहोचला आणि फक्त ३ दिवसांत आमच्या मुलांना न्याय मिळाला.”

जेव्हा समाज उभा राहतो, तेव्हा यंत्रणाही झुकते

KST उर्दू शाळेची वर्षानुवर्षांची मनमानी, अरेरावी आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान केवळ तीन दिवसांत संविधानिक मार्गाने संपवले गेले.
ही केवळ ८० विद्यार्थ्यांची नाही, तर प्रत्येक पालकाची विजयगाथा आहे जो आपल्या मुलाच्या भविष्यासाठी झगडत होता.

हे सगळे शक्य झाले – एका निवेदनामुळे, एकतेमुळे आणि दृढ निश्चयामुळे.