जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अधिकारांची ताकद वापरून ठोस कारवाई केली – एकता संघटनेच्या कार्यकर्त्यांचा संघर्ष रंगला, शाळेच्या मनमानीला आळा बसून ८० विद्यार्थ्यांना मिळाला न्याय!

नशिराबाद : नशिराबाद येथील KST उर्दू हायस्कूल मध्ये ८० विद्यार्थ्यांना त्यांचे टीसी (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) दिले जात नव्हते. मात्र, एकता संघटना आणि नशिराबादच्या जागरूक नागरिकांच्या तीव्र संघर्षामुळे अखेर विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क मिळाला.

तीन दिवस चाललेली संविधानिक लढाई – CEO मीनल करणवाल यांना दिले निवेदन

संघटनेने शिक्षण विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल मॅडम यांना निवेदन दिले, ज्यात शाळा प्रशासनाची मनमानी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होत असलेली खेळवाड याबाबत माहिती देण्यात आली होती.

निवेदन झाले शस्त्र – FIR झाला कारवाईचा पाया

CEO मॅडम यांनी तात्काळ दखल घेत, माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना कारवाईसाठी निर्देश दिले आणि आवश्यकता भासल्यास FIR नोंदवण्याचे आदेश दिले. २७ जून रोजी FIR दाखल झाली आणि प्रशासन हालचालीस लागले.

प्रशासन व पोलिसांनी घेतले चार्ज – शाळेचे कुलूप तोडले

आज २८ जून रोजी, शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षण मंडळ अधिकारी पोलिस बंदोबस्तासह शाळेत पोहोचले.
शाळा प्रशासनाचा अरेरावीपणा आणि शिक्षकांचा हुकूमशाही वर्तन पाहून प्रशासनाने कठोर पाऊल उचलले.

प्रशासनाच्या आदेशावर शाळेचे मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडण्यात आले, कागदपत्रे बाहेर काढण्यात आली, आणि सर्व ८० विद्यार्थ्यांना त्यांचे टीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

फारूक शेख, नदीम मलिक, मतीन पटेल, अनिस शाह, मौलाना रहीम पटेल, मजहर पठाण, वासिफ सर, हाफिज शाहिद, रईस शेख आणि इतर कार्यकर्त्यांनी संघर्षाची सुरुवात पहिल्याच दिवशी केली होती.
आज जेव्हा विद्यार्थ्यांच्या हातात त्यांच्या प्रमाणपत्रांची फाईल होती, त्यांच्या डोळ्यात आनंद आणि मनात समाधान स्पष्ट दिसून येत होते.

आता हे विद्यार्थी ११वीत प्रवेश घेण्यास पात्र झाले असून त्यांचे शिक्षण वाचले आहे.

पालक म्हणाले – “संघटना नसती, तर आम्ही हताश झालो होतो”

पालकांनी स्पष्ट सांगितले की एकता संघटना नसती, तर आम्हाला अजूनही शाळा प्रशासनाकडून दटावले गेले असते.
“आम्ही किती वेळा विनंती केली, पण ऐकलेच नाही… संघटनेमुळे आमचा आवाज पोहोचला आणि फक्त ३ दिवसांत आमच्या मुलांना न्याय मिळाला.”

जेव्हा समाज उभा राहतो, तेव्हा यंत्रणाही झुकते

KST उर्दू शाळेची वर्षानुवर्षांची मनमानी, अरेरावी आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान केवळ तीन दिवसांत संविधानिक मार्गाने संपवले गेले.
ही केवळ ८० विद्यार्थ्यांची नाही, तर प्रत्येक पालकाची विजयगाथा आहे जो आपल्या मुलाच्या भविष्यासाठी झगडत होता.

हे सगळे शक्य झाले – एका निवेदनामुळे, एकतेमुळे आणि दृढ निश्चयामुळे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *